महाराष्ट्रविदेश
Trending

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभिकरणाचा वाद पेटला, पोलिसांना चौकशीचे आदेश

मुंबई, 8 सप्टेंबर –1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या समाधीच्या देखभालीच्या कामावरून वाद सुरू झाला आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) दावा केला आहे की त्यांच्या (मेमन) कबरचे “सुशोभिकरण” केले गेले आहे आणि आणि त्याचे श्रद्धास्थानात रूपांतर करण्याचा घाट घातला जात आहे.

या वृत्तानंतर मुंबई पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत दहशतवाद्याच्या थडग्याभोवती लावलेला ‘एलईडी लाईट’ काढून टाकला. मेमनला 2015 मध्ये नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली आणि दक्षिण मुंबईतील बडा स्मशानभूमीत त्याचे दफन करण्यात आले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस उपायुक्त (डीसीपी) दर्जाचा पोलिस अधिकारी दहशतवाद्याच्या कबरीला ‘एलईडी दिवे’ कसे बसवले आणि संगमरवरी ‘टाईल्स’ने कसे सजवले गेले याचा तपास करेल.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना समाधीचे रूपांतर मकबर्यात करण्यात आल्याचा दावा महाराष्ट्रातील काही भाजप नेत्यांनी केला होता.

ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने सांगितले की, वाढती महागाई आणि बेरोजगारी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.

भाजपचे प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ठाकरे यांनी 250 लोकांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तीच्या कबरीचे “सुशोभीकरण” करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्रातील लोकांची माफी मागितली पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याप्रकरणी माफी मागावी, असे भाजपच्या अन्य एका स्थानिक नेत्याने म्हटले आहे.

शब-ए-बरातच्या निमित्ताने बडा कब्रस्तानमध्ये हॅलोजन दिवे लावण्यात आले होते आणि कब्रस्तानच्या विश्वस्तांनी ते काढून टाकले आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मेमनच्या कबरीभोवती तीन वर्षांपूर्वी संगमरवरी टाइल्स बसवण्यात आल्या होत्या.

त्यांनी सांगितले की 13 इतर कबरी देखील आहेत.

Back to top button
error: Content is protected !!