महाराष्ट्रराष्ट्रीय
Trending

मनी लाँड्रिंग प्रकरणः अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने आदेश राखून ठेवला !

मुंबई, २८ सप्टेंबर – मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केलेल्या महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला.

अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती एनजे जमादार यांनी या खटल्याची सुनावणी पूर्ण केली.

न्यायमूर्ती म्हणाले की, न्यायालय लवकरात लवकर निकाल देण्याचा प्रयत्न करेल.

सुमारे सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मंगळवारी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी सुरू केली.

जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास झालेल्या विलंबाबाबत देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याचा संदर्भ देत न्यायमूर्ती जमादार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते देशमुख यांचे वकील विक्रम चौधरी यांना म्हणाले की, जलद सुनावणीसाठी अर्ज येथे नमूद केला जाऊ शकतो.

यावर चौधरी म्हणाले की, त्यांची तक्रार उच्च न्यायालयाविरुद्ध नसून ईडीच्या अधिका-यांच्या विरोधात आहे जे अधिक काळ स्थगिती मागतात.

अर्जाला विरोध करताना एएसजी सिंग यांनी दावा केला की, देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार, पदाचा गैरवापर आणि मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप आहेत.

ते म्हणाले, “आर्थिक गुन्हेगारी गंभीर आहे आणि त्याचा देशाच्या आर्थिक ताकदीवर परिणाम होतो.

देशमुख यांच्या वकिलाने म्हटले होते की, त्यांची प्रकृती आणि वयाच्या आधारावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात यावी. देशमुख यांना असा कोणताही आजार नाही, ज्यावर जेलच्या रुग्णालयात उपचार होऊ शकत नाहीत, असे सांगत सिंग यांनी याला विरोध केला.

चौधरी यांनी युक्तिवाद केला की, ईडीचा तपास कधीच संपणार नाही.

देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

Back to top button
error: Content is protected !!