राष्ट्रीय
Trending

गंगोत्रीहून परतणारे 400 यात्रेकरू उत्तरकाशी जिल्ह्यात भूस्खलनामुळे अडकले !

राजस्थानचे सर्व यात्रेकरू सुखरूप

जयपूर, 23 सप्टेंबर – उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे राजस्थानमधील सुमारे 400 यात्रेकरू अडकले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. हे सर्व यात्रेकरू सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गंगोत्री धामहून परतणारे राजस्थानचे सुमारे 400 यात्रेकरू उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गबनानीजवळ भूस्खलनामुळे अडकले आहेत.

त्यांनी सांगितले की, राजस्थानच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाशी बोलून त्यांना सुरक्षित स्थळी नेले आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही केली.

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) कमांडंट राज कुमार गुप्ता म्हणाले की, गुरुवारी रात्री, राजस्थानमधील यात्रेकरू उत्तरकाशीमध्ये अडकल्याची माहिती मिळाली, त्यानंतर एसडीआरएफचे अतिरिक्त महासंचालक सुष्मित बिस्वास यांनी उत्तराखंडमधील त्यांच्या समकक्ष पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधला-दीपम सेठ आणि डॉ. पीव्हीके प्रसाद यांनी घटनेची माहिती घेतली.

उत्तराखंड प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरकाशी आणि हर्षिल (हलगु गार्ड आणि गबनानी) दरम्यानचा रस्ता या भागात अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाल्यामुळे गुरुवारी संध्याकाळपासून बंद करण्यात आला आहे. राजस्थानसह इतर राज्यातील अनेक नागरिक घटनास्थळी अडकून पडले आहेत.

गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. ते म्हणाले की राजस्थानमधील भिलवाडा, अजमेर आणि इतर ठिकाणांहून सुमारे 400 यात्रेकरूंना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार यात्रेकरूंसाठी निवास आणि भोजनाचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या मदतीबाबत त्यांच्याशी बोलून माहिती घेण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!